वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेना

मागील अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने सर्वच पिके करपून जात आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर या हंगामात पिकांवर केलेला खर्चसुद्धा भरून निघेल असे वाटत नाही. - श्रीकृष्ण जुनारे, शेतकरी, शेंबा बुद्रुक, जि. बुलडाणा
वाढत्या उष्णतेचा पिकांवर परिणाम
वाढत्या उष्णतेचा पिकांवर परिणाम

अकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल तापमानात अचानक वाढ झाली असून, हे उष्णतामान पिकांना मानवत नसल्याचे समोर अाले अाहे. पावसाचा २० दिवसांपेक्षा अधिक काळ खंड पडल्याने व तापमान वाढल्याने सर्वच पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली अाहे.  

वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये गेल्या २० दिवसांपासून पाऊस गायब झालेला अाहे. सुरवातीला अकोला व वाशीम जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात जेमतेम पाऊस झालेला अाहे. सध्या कुठेही पाऊस नसल्याने व त्यातच दिवसाचे कमाल तापमान अचानक वाढल्याने पिकांची काहिली होत अाहे. अाजवर टिकून असलेली अार्द्रता या तापमानामुळे झपाट्याने कमी होत अाहे.  याचा परिणाम खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी पिकांवर होऊ लागला.

बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचे पीक पिवळे पडणे, शेंगा लागलेल्या असून, त्यात दाणे भरण्याची प्रक्रीया संथगतीने होणे, कपाशीमध्ये फूल-पाती गळ होत अाहे. भाजीपाला, फळबागांनाही पाण्याची नितांत गरज अाहे. अशातच वीज भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत अाहे. वीज रोहित्रांचे प्रश्न गंभीर झाले अाहेत.

तापमान वाढल्याने दुपारी सर्वच पिके सुकत असल्याचे दिसून येते. पावसाच्या खंडाचे दिवस वाढल्यास उत्पादनाला थेट फटका बसण्याची भीती व्यक्त होत अाहे. प्रामुख्याने याचा पहिला परिणाम सोयाबीन उत्पादनाला बसण्याची लक्षणे दिसून येत अाहेत.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com