नगर जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदी

जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदी
जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदी

नगर : जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. जिल्ह्यामध्ये शिल्लक असलेला चारा इतर जिल्ह्यांत जाऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा दंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास बंदी घातली असून, आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे मात्र शेजारच्या मराठवाड्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण होणार आहे.

नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पाण्यासोबत चाऱ्याचाही प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. एप्रिल-मे च्या काळात गंभीर चारा टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर २०१८ अखेर पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी आहे. पुढील कालावधीत पावसाची शक्‍यता कमीच आहे. जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई व जनावरांना चाराटंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे चाऱ्याची पळवापळवी होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दोन महिन्यांच्या कालावधीकरिता (डिसेंबरअखेर) जिल्ह्याच्या बाहेर चाऱ्याची वाहतूक करता येणार नाही. तसा आदेश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी काढला आहे.

नगर जिल्हा हा उसाचा जिल्हा म्हणून संबोधला जातो. आताही काही ठिकाणी बऱ्यापैकी ऊस आहे. दुष्काळी स्थितीत चाऱ्यासाठी उसाचा वापर केला जातो. आत्तापर्यंत चारा छावण्यांत उसाने जनावरे जगवण्याला आधार दिला आहे. यंदा मात्र शेजारच्या बीड, सोलापूर, औरंगाबाद भागात ऊस चाऱ्यासाठी नेला जातो. यंदा मात्र त्या भागात ऊस नाही आणि नगरमधून चारा नेण्यासाठी बंदी घातली असल्याने या जिल्ह्याची अडचण होऊन बसली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com