बदलत्या वातावरणाचा केळीला फटका

बदलत्या वातावरणाचा केळीला फटका
बदलत्या वातावरणाचा केळीला फटका

जळगाव : हिवाळ्याच्या शेवटच्या कालावधीत विषम वातावरण तयार झाल्याने त्याचा फटका केळीसह हरभऱ्याला अधिक बसला आहे. जिल्ह्यात दोन ते महिने कालावधीच्या केळी बागांसह घाटे पक्व होत असलेल्या हरभऱ्यामध्ये अधिकचे नुकसान दिसून येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  जिल्ह्यात दोन दिवसांपासून निरभ्र वातावरण आहे. परंतु १ ते १३ फेब्रुवारीपर्यंत ढगाळ वातावरण होते. याचा अधिकचा परिणाम केळी पिकावर झाला. दोन महिने कालावधीच्या केळीची वाढ थांबली. निरभ्र वातावरण नसल्याने करपा रोगाला सक्रिय करणारी बुरशी सक्रिय झाली. झाडाची पाने पिवळी पडल्याने प्रकाश संश्‍लेषणाच्या प्रक्रियेत अडथळे आले. मुळांना अन्नद्रव्य घेण्यास समस्या निर्माण झाली. सहा महिने कालावधीच्या केळीत करपा रोगाचे प्रमाण प्रतिझाड सहा पाने तर दोन ते तीन महिने कालावधीच्या केळी बागेत प्रतिझाड चार पाने, असे करपाचे प्रमाण आहे.  ज्या बागा निसवल्या त्यात हिरवी पाने लवकर पिवळी पडली व वाळली. मध्यरात्री थंडी व दिवसा उष्णता, आर्द्रता यामुळे घड पक्व होण्याचे प्रमाण कमी झाले. निसवणीनंतर केळीची कापणी व्हायला एक महिना कालावधी लागला. बुरशीनाशकांची फवारणी लहान बागांमध्ये घ्यावी लागली. त्यात उत्पादन खर्चही वाढला. सद्यःस्थिती वातावरण निवरले असले तरी केळीची वाढ समाधानकारक नाही. तसेच घडांचा दर्जाही हवा तसा नाही. आखूड केळीचे घड अधिक असून, अनेक ठिकाणी घडांचा आकारही लहान असल्याचे शेतकरी लालचंद पाटील (नशिराबाद, जि. जळगाव) म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com