शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस, कधी जास्त तर कधी कमी पाऊस; यापेक्षा जास्त शासनाच्या धोरणाने शेतकरी मरत आहेत. शेतकऱ्यांची मेहनत कोणीच मोजत नाही. जाती-धर्माच्या नावाने जेवढे पेटून उठता तेवढेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी (ता. १९) केले.

सेलू (जि. परभणी) येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजीराजे भोसले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित चारदिवसीय राज्यस्तरीय बळिराजा कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते झाले.

यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे होते. स्वागताध्यक्ष तथा आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला राठोड, सहायक जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे, कृषी सभापती श्रीनिवास मुंढे, डाॅ. संजय रोडगे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने, राम पाटील, रामराव उबाळे, इंद्रायणी रोडगे, कृषी विकास अधिकारी बी. एस. कच्छवे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, स्वरूप कंकाळ, डाॅ. यू. एन. आळसे, मुख्य संयोजक छगन शेरे, अजय चौधरी, डाॅ. शरद कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आमदार कडू म्हणाले की, मिरवणूक वजा करून कृषी प्रदर्शन भरवले ही काळाची गरज आहे. व्यवस्था वाईट आहे. ज्यांचा आवाज आहे त्यांचीच सत्ता आहे. जितका इंच नांगर जमिनीत घालता त्याच्या अर्धा तरी नांगर सरकारात घातला तर तुमचे सर्व प्रश्न सुटतील. राजकारणाचे शुद्धीकरण होणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com