तीन हजार कोटी खर्चूनही बेंबळा प्रकल्प अपूर्णच

बेंबळा प्रकल्प
बेंबळा प्रकल्प

यवतमाळ   ः चार तालुक्‍यांतील शेतीसाठी वरदान ठरू पाहणारा बेंबळा प्रकल्प तीन हजार कोटी रुपये खर्च करूनही अपूर्णच आहे. परिणामी या भागातील शेती सुजलाम सुफलाम होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे.

१९८३ मध्ये बेंबळा धरण व कालवे प्रकल्पाला मंजुरी मिळाली. त्या वेळी ५०.७६ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी पुढाकार घेतल्याने तत्कालीन पालकमंत्री ॲड. शिवाजीराव मोघे व पाटबंधारे राज्यमंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या हस्ते बेंबळा धरण कालव्याचे भूमिपूजन २२ फेब्रुवारी १९८८ ला करण्यात आले होते. त्या वेळी ६३.५० कोटींच्या सुधारित खर्चास मंजुरी दिली गेली. त्यानंतर ३५ वर्षांनतर धरण पूर्ण झाले. मुख्य कालवे व इतर कामे पूर्ण झाली असली, तरी शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न अपूर्णच आहे. तब्बल तीन हजार कोटींपेक्षा अधिकचा खर्च करूनही हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे.

बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव या चार तालुक्‍यांतील ३८ हजार हेक्‍टर क्षेत्राचे सिंचनाचे उद्दिष्ट सुरवातीला ठरविण्यात आले होते. नंतर ४५ ते ५० हजार हेक्‍टर शेती सिंचनाखाली येईल असा दावा विभागाने केला. यात राळेगाव तालुक्‍यात सर्वाधिक १५ हजारांपेक्षा जादा हेक्‍टर क्षेत्र सिंचनाचे उद्दिष्ट असताना आता केवळ २ हजार हेक्‍टरच्या आसपास सिंचन होते किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्‍त होत आहे.

या प्रकल्पाच्या शून्य ते १०० किलोमीटरपर्यंत मुख्य कालव्याची कामे झाली. मात्र केवळ ६० किलोमीटर क्षेत्रातील कालवे सिमेंट काँक्रिटीकरणाने पक्‍के बांधण्यात आले. मारेगावात केवळ तीन किलोमीटरची कालव्याची कामे झाली. १३ किलोमीटरची कामे अद्यापही अपूर्ण आहे. उपकालवे काही ठिकाणी झाले. मात्र अनेक ठिकाणी अपूर्णच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com