येवला तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झळा

शासनाने येवला तालुक्यातील काही गावे दुष्काळी म्हणून घोषित केले. मात्र अद्याप या गावांना दुष्काळाच्या कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. शासनाने तात्काळ दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्यात. - भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती. पावसाच्या भरवश्यावर पिके घेतली. मात्र पाण्याअभावी ती जळून गेली. पाण्याचा प्रश्न अडचणींचा आहे. त्यासोबत कुठलाही रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. - नारायण पवार, कुसमाडी, ता.येवला येवला तालुक्यातील पूर्व- उत्तर भागात पाण्याची टंचाई आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील नागरिकांना पाणी कसे उपलब्ध करून देता, येईल यावर काम सुरू आहे. पालखेडच्या अवर्तनामुळे टंचाई निवाररण्यास हातभार लागेल. - अन्सार शेख, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, येवला.
येवला तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झळा
येवला तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झळा

नाशिक : या वर्षीच्या कमी पावसामुळे येवला तालुका दुष्काळाच्या झळांनी बेजार आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा पार करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाऊस न पडल्यामुळे नदी, नाले, साठवण बंधारे कोरडे पडले आहेत. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, नागरिक चिंतेत आहेत.

पावसाचे प्रमाण कमी असताना तालुक्यातील शेतकऱ्यांनी थोड्या पाण्यात कांदा उत्पादन घेतले. पिकासाठी खर्च करूनही तो वसूल झाला नाही. विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. अगदी सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भभला. शेती ओस पडल्याने त्यावर अवलंबून राहणाऱ्या मजुरांच्या हाताना काम नाही. रोजगाराअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

मागील वर्षांपासून तालुक्यातील १४ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उत्तर-पूर्व भागात मोठी दुष्काळी परिस्थिती आहे. माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याच्या प्रश्न आहे. यासाठी साठवलेला चाराही संपत आला आहे. जनावरे जागविण्याचा मोठा प्रश्न आहे.

येवला तालुक्यातील ६ मंडलांपैकी ५ मंडले दुष्काळी म्हणून जाहीर केली आहेत. तालुक्यातील सर्वच स्रोत आटल्यामुळे शासकीय यंत्रणेद्वारे ५० गावे व जवळपास ३० वाड्या, वस्त्यांना २९ टँकरद्वारे पिण्याचे पाणीपुरवठा केला जात आहे.

पाण्याचा टँकर आल्यानंतर नागरिकांची मोठी झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पश्चिम भागात ३८ गावे पाणीपुरवठा योजनेद्वारे ५७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com