राज्यात सन्मानपूर्वक दोन्ही पक्षांची आघाडी होणार : अशोक चव्हाण

राज्यात सन्मानपूर्वक दोन्ही पक्षांची आघाडी होणार : अशोक चव्हाण
राज्यात सन्मानपूर्वक दोन्ही पक्षांची आघाडी होणार : अशोक चव्हाण

परभणी : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली नसल्याने दोन्ही पक्षांचे नुकसान झाले आहे. आता मात्र, यापुढे राज्यात सन्मानपूर्वक दोन्ही पक्षांची आघाडी होऊन राज्यात आघाडीचे सरकार आणण्याचे लक्ष असणार आहे, अशी माहिती कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. १६) दिली. पैशाच्या जोरावर लोकशाही मूल्य पायदळी तुडवण्याचे काम विद्यमान भाजपचे सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीतील आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांच्या प्रचारार्थ बुधवारी येथील राष्ट्रवादी भवनात खासदार श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.  खासदार चव्हाण म्हणाले, ‘‘राज्यात कर्जमाफीची फसवी घोषणा झालेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे या सरकाराला काहीचच वाटत नसल्याची टीका त्यांनी केली. २०१४ मध्ये आघाडी न झाल्याचे परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागले. त्यामुळे आता राज्यात आघाडी होईल, अशी यात शंका नाही. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर याची बोलणी सुरू असून, सध्य परिस्थितीला परभणीतून आघाडीची सुरवात झाली असल्याने त्याच पद्धतीने राज्यात आघाडी होऊन पुन्हा आम्ही सत्तेवर येऊ.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com