बीटी कापूस उत्पादकांचा आज एल्गार मेळावा

बोंडअळी
बोंडअळी

अकोला ः या हंगामात बीटी कपाशीवर आलेल्या बोंड अळीने शेतकरी उद्ध्वस्त झाला असून, आर्थिक अडचणीत सापडला आहे. बीटी कापूस तंत्रज्ञानामुळे झालेल्या हानीची जाण केंद्र शासनाला व्हावी व त्यांच्याकडून शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळावी, यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मूर्तिर्जापूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी (ता. २५) दुपारी चार वाजता बाजार समितीच्या प्रांगणात हा एल्गार मेळावा होणार आहे.  बीटी कंपन्यांकडून एकरी २५ हजार रुपये लागवड खर्च मिळावा, सन २०१५-१६ ची दुष्काळी मदत मिळावी, उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफा या भावाने शेतमालाची खरेदी व्हावी, शेत कुंपणाला १५ वर्षे दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्याबाबत सूचना करावी, ४८ पैसे आणेवारी जाहीर झाल्यामुळे दुष्काळ घोषित करून चारा डेपोची निर्मिती करावी, मजुरांसाठी रोजगार हमीचे कामे त्वरित चालू करून रोजगाराची निर्मिती करावी आदी मागण्यांसाठी शेतकरी शेतमजूर एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे, नितीन गावंडे, जनमंच शाखेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर गौरखेडे, शेकापचे विजय गावंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे, किसान संघाचे राहुल राठी, शरद बंग यांच्यासह इतरांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com