शेतकरी अात्महत्यांनी बुलडाणा हादरला

शेतकरी अात्महत्यांनी बुलडाणा हादरला
शेतकरी अात्महत्यांनी बुलडाणा हादरला

बुलडाणा  ः खरीप हंगाम सुरू झाला असून, पैशांची तजवीज होत नसल्याने शेतकरी अार्थिक संकटात अाहे. गेल्या २४ तासांत बुलडाणा जिल्ह्यात चार शेतकरी अात्महत्यांच्या घटना समोर अाल्या अाहेत.

जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे शनिवारी (ता. २३) विठ्ठल सीताराव धर्मे (वय ५५) या शेतकऱ्याने बँकेच्या कर्जापायी अात्महत्या केली. धर्मे यांनी दीड वर्षापूर्वी शेती विकून बँकांचे कर्ज भरले. मागील वर्षी त्यांनी पाच एकर शेती ठोक्याने केली व त्यात कपाशीची लागवड केली. मात्र, बोंड अळीमुळे त्यांचे हे पीक हातातून गेले. पुन्हा ते कर्जबाजारी झाले. या परिस्थितीमुळे त्यांनी शनिवारी अात्महत्या केली.

जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील हिवरा येथील भागवत कनिराम बघे यांनी विष प्राशन करून आपले जीवन संपविले. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील अमोल काशीराम झाडे यांनीसुद्धा सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आपले जीवन संपविले.  मलकापूर तालुक्यातीलच माकनेर येथील महिला शेतकरी वैशाली तानाजी खरासने यांनीसुद्धा आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या केली. गेल्या २४ तासांत अात्महत्यांच्या या घटना झाल्या असून जिल्हा हादरला अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com