मोहळ तालुक्यात कालव्याला पाणी सुटल्याने फळबागांना दिलासा

मोहळ तालुक्यात कालव्याला पाणी सुटल्याने फळबागांना दिलासा
मोहळ तालुक्यात कालव्याला पाणी सुटल्याने फळबागांना दिलासा

मोहोळ, जि. सोलापूर  : उजनीच्या डाव्या कालव्याला पाणी सुटल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. अत्यंत कडक उन्हाळ्यात पाणी सुटल्याने ऊस, मका, भुईमूग, कडवळ या पिकासह डाळिंब, द्राक्ष, बोर, केळी या फळबागांना जीवदान मिळाले आहे. गेल्या आठवड्यातच यापूर्वी कालव्याला सोडलेले पाणी बंद झाले होते. मात्र, लगेच आठवड्यातच पाणी सुटल्याने शेतकरी ऊसबांधणीच्या कामाला लागला आहे. या पाण्यामुळे बोअर, विहिरी आदींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.  सध्या मोहोळ तालुक्‍यात काही फळबागा फळधारणेच्या अवस्थेत आहेत तर बोर व डाळिंबाची छाटणी सुरू आहे. या पाण्याचा फळबाग वाढीसाठी मोठा उपयोग होणार असून काकडी, टोमॅटो, कलिंगड, खरबूज आदी वेलवर्गीय पिकांनाही दिलासा मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com