नवी दिल्ली ः साखर उतारा कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील गाळप हंगाम काहीसा उशिरा सुरू होण्याची शक्यता अाहे. यंदाचा गाळप हंगाम अाॅक्टोबरच्या अखेरीस सुरू होईल, अशी माहिती कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दिली अाहे.
तसेच उत्तर प्रदेशचे ऊस विभागाचे सहायक अायुक्त विष्णूकुमार शुक्ला यांनीही गाळप हंगाम उशिरा सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले अाहे.
यंदा गाळप हंगाम १० अाॅक्टोबरपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र साखर उतारा कमी मिळणार असल्याच्या शक्यतेने गाळप हंगाम लांबणीवर पडला अाहे. विशेषतः उत्तर प्रदेशातील पश्चिम भागात साखर उतारा ७ टक्के एवढा कमी मिळत अाहे.
गेल्या वर्षीच्या हंगामात सरासरी साखर उतारा १०.६१ टक्के एवढा राहिला होता. जोपर्यंत रात्रीच्या तापमानात घट होत नाही; तोपर्यंत साखर उताऱ्यात सुधारणा होणार नाही. त्यासाठी गाळप उशिरा सुरू केले जाणार अाहे, असे ऊस विभागाचे सहायक अायुक्त शुक्ला यांनी म्हटले अाहे.
राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनीदेखील अाॅक्टोबरच्या अखेरीस अथवा नोव्हेंबरच्या सुरवातीला गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी केली अाहे.