जनावरांचा गाभण काळ हा अतिशय संवेदनशील काळ असतो. या काळात जनावरे अाजाराला बळी पडतात. त्यांना शारीरिक पोषणासाठी जास्त पोषणतत्त्वांची आवश्यकता असते. गाभण काळात जनावरांचे योग्य व्यवस्थापन ठेवल्यास आजार कमी होतात व दूध उत्पादनसुद्धा वाढते. गाभण जनावरांच्या व्यवस्थापनात विण्याच्या आधी आणि विल्यानंतर महत्त्वाचे बदल करावे लागतात. या काळात गाभण जनावरांना जास्त ऊर्जा आवश्यक असते. ती ऊर्जा चांगल्या प्रतीचा चारा दिल्यास मिळू शकते. गोठ्याचे व्यवस्थापन
विल्यानंतर घ्यावयाची काळजी गाय, म्हैस विल्यानंतर सुरुवातीचे २१ दिवस भूक कमी असते. तर दूध उत्पादन वाढत असते, यामुळे एकीकडे शरीरात कमी पोषणतत्त्वे जातात आणि दुसऱ्या बाजूने दूध उत्पादन वाढत असल्यामुळे पोषणतत्त्वांचा जास्त प्रमाणात निचरा दुधाद्वारे शरीराबाहेर केला जातो, यामुळे एकतर जनावर अशक्त होते आणि पुढील दूध उत्पादनही घटते, नंतर जनावर वेळेवर माजावर येत नाही, माजावर आलेच तर गर्भधारणा होत नाही. हे सर्व टाळण्यासाठी या काळात कमी चाऱ्यातून जास्त पोषणमूल्य पुरवठा होईल असा चारा आणि खुराक जनावरांना द्यावा. यामध्ये लसूणघास, बरसीम, डीएचएन-६ इ. असा चारा आणि उत्तम प्रतीच्या पशुखाद्याचा वापर करावा. याबरोबरच जास्तीची ऊर्जा आणि प्रथिनांची गरज भरून काढण्यासाठी आहारामध्ये बायपास फॅट आणि बायपास प्रथिनांचा गरजेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा. पहिल्यांदा विलेल्या कालवडीमध्ये प्रथिनांची गरज एकापेक्षा जास्त वेत झालेल्या गायीपेक्षा वाढलेली असते. खाद्य व्यवस्थापन
गाभण काळातील व्यवस्थापनाचे महत्त्व
संपर्क ः डॉ. पवनकुमार देवकते, ९९७०२८५५८५ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.