देशात कडधान्याचा पेरा वाढला

पेरणी
पेरणी

नवी दिल्ली ः देशात यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या ५४.५ दशलक्ष हेक्टरच्या तुलनेत यंदा ५४.६ दशलक्ष हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते. मात्र रब्बी हंगामात कडधान्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली असून यंदा १४.६ दशलक्ष हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी १३.४ दशलक्ष हेक्टरवर कडधान्य पिकांची पेरणी झाली होती.   सरकराने यंदा शेतकऱ्यांना कडधान्य पेरणीला प्रोत्साहन दिले आणि किमान आधारभूत किमतीत केलेली वाढ, अशा सरकारी धोरणांमुळे कडधान्य पीक लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच सरकारने डाळींवरील निर्यातबंदी उठवली आहे. तसेच तुरीवर १० टक्के, पिवळ्या वाटाण्यावर ५० टक्के आणि हरभरा आणि मसूरवरील आयात शुल्क प्रत्येकी ३० टक्क्यांनी वाढविले आहे. त्याचा उडीद आणि मुगाच्या आयातीवरही परिणाम झाला आहे.  रब्बीतील प्रमुख पीक असलेल्या हरभऱ्याचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी सरकारने प्रयत्न केले असून त्यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत १३.९ टक्क्यांनी वाढ झाली असून ते १० दशलक्ष हेक्टरवर पोचले आहे. मात्र गव्हाचे लागवड क्षेत्र यंदा कमी झाले असून एकूण २.६३ दशलक्ष हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी २.७३ दशलक्ष हेक्टरवर गव्हाची लागवड झाली होती. त्यातच सरकारने गव्हावरील आयात शुल्क दुपट्टीने वाढविले आहे. तसेच शेतकरीदेखील देशांतर्गत कमी किमतीमुळे गव्हाची पेरणी करण्यास उत्सुक नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दर घसरल्यामुळे मोहरी आणि तेलबियांच्या लागवड क्षेत्रातदेखील घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या ६.८ दशलक्ष हेक्टरच्या तुलनेत यंदा ६.३ दशलक्ष हेक्टरवर मोहरी आणि तेलबियांची पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com