जिल्ह्यात पाचोरा, जळगाव व अमळनेर येथे मार्केटिंग फेडरेशनचे सब एजंट म्हणून बाजार समिती व इतर संस्थांनी कडधान्य खरेदी केंद्र सुरू केले. परंतु या केंद्रांवरही अल्प आवक होत आहे. या तिन्ही केंद्रांवर उडदाची मिळून २४००, मुगाची १९९४ आणि सोयाबीनची फक्त ९३.५० क्विंटल खरेदी झाली आहे.
सोयाबीनची अत्यल्प खरेदी झाल्याचे स्पष्ट झाले असून, निकषांमुळे ही आवक कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आर्द्रता, कचरा अशी कारणे सांगून खरेदी टाळली जाते. शेतकऱ्यांना परत पाठविले जाते, असे दावे शेतकऱ्यांनी केले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.