चंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच गावांचा संपर्क तुटला

चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला
चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे पाच गावांचा संपर्क तुटला

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोंडपिपरी तालूक्यातील वर्धा नदीवरील आंतरराज्यीय पोडसा पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून दोन फुट पाणी वाहत आहे. सकमूर येथील नाल्यावर पाणी आल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

पोडसा पुलाची निर्मिती झाल्यानंतर पहिल्याच वर्षी पुराने क्षतीग्रस्त झाला होता. यावेळेसचा पूर बघता पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रमेश शंभरकर यांनी तालुका प्रशासनाना धोक्याची सूचना दिली होती.

यानंतर कालपासून लाठीचे ठाणेदार प्रविण मानकर यांनी पुलावर गस्त लावली व वाहतूक बंद केली. यानंतर रात्रीच पुलावरून पाणी वाहू लागले. आज पुलावर दोन फुट पाणी आहे. हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान...

सकमूर येथील नाला ओसंडून वाहत असल्याने या मार्गावरील पाच गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे सुरक्षेची काळजी घेता धाब्याचे ठाणेदार महेंद्र आंभोरे यांनी सकमुरजवळ पोलीसांची गस्त सुरू केली आहे.

क्षतीग्रस्त पुलावर पाणी आल्याने पुलाचा काही भाग खचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काल उपविभागीय अभियंता रमेश शंभरकर यांनी पोडसा पुलाची पाहाणी केली. मुसळधार पावसाने परिसरातील हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उभे पीक पाण्यात पूर्णपणे बूडालेले आहे, यामुळे शेकडो शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com