पीकविम्याचे निकष बदला; सांगलीत आज स्वाभिमानीचा मोर्चा

पीकविम्याचे निकष बदला; सांगलीत आज स्वाभिमानीचा मोर्चा
पीकविम्याचे निकष बदला; सांगलीत आज स्वाभिमानीचा मोर्चा

सांगली : अवकाळी पाऊस आणि गारपीट पावसाने द्राक्ष आंबा आणि ऊस पिकांचे सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, एक रुपयाचाही पीक विमा योजनेतून नुकसानभरपाई मिळणार नाही. त्यामुळे पीकविमा योजनेचे निकष बदला आणि नुकसानभरपाई द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज (ता. २५) जिल्हाधिकारी मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. श्री. खराडे म्हणाले, जिल्ह्यातील येळावी, आरवडे, हातनूर यासह परिसरांतील गारपीटमुळे द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळधारणा करणाऱ्या काड्या तुटल्या आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार थाटणीची वेळ आली आहे. द्राक्ष पीक विमा योजनेचा कालावधी सप्टेंबर ते एप्रिल अखरे आहे. या कालावधीत नुकसान झाल्यास पाऊस किती झाला त्यानुसार भरपाई मिळते. मात्र, ५० मि. मी पेक्षा जास्त पाऊस २४ तासांत झाला तरच नुकसानभरपाई मिळते. त्यामुळे पीक विमा योजना म्हणजे एक मृगजळ आहे. ती योजना शेतकरी हिताची नसून कंपनीच्या हिताची आहे. त्यामुळे पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या करण्यासाठी विमा योजनेचे सर्व निकष बदलणे गरजेचे आहे. तरच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल. शुक्रवारी (ता. २५) रोजी सकाळी १० वाजता मोर्चा विश्रामबाग चौकातून निघेल. या मोर्चासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खराडे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com