छत्रपती शाहू महाराज यांनी नवमहाराष्ट्राची निर्मिती केली : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांनी नव महाराष्ट्राची निर्मिती केली. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय'' या मार्गांनी महाराजांनी काम केले. त्यातून एक परंपरा सुरू झाली आणि या परंपरेचे पाईक म्हणून अनेकांनी काम केले, अशांनी आपल्या कर्तृत्वातून महाराष्ट्र घडवला. त्यात कै. विक्रमसिंह घाटगे यांचे नाव घेता येईल, असे गौरवोद्‍गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १३) येथे केली.  कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक कै. विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण कारखाना कार्यालयाच्या परिसरात झाले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात श्री. फडणवीस बोलत होते. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात श्री. फडणवीस बोलत होते.  ‘‘क्रीडा सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केले. कै. घाटगे यांचे संपूर्ण आयुष्य बघितले तर इतक्‍या संस्था स्थापन करून त्यांनी समाजाचे परिवर्तन करण्याचे काम केले. हे सर्व करत असताना त्यांची संवेदनशीलताही महत्त्वाची आहे. कर्णबधिर मुलांची शाळा असो किंवा अनाथ मुलांसाठी शाळा असो त्यातून राजे किती संवेदनशील होते हे दिसून येते. राजकारणात एका वेगळ्या प्रकारचे राजकराण आणि समाजकारण केले. राजकारणात अनेक प्रसंग येतात, अशा प्रसंगात आपण धैर्य सोडत नाही, आपण फक्त काम करत राहतो, त्या वेळी समाजही मागे उभे राहतो,’’ असे मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले.   या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे, संजय मंडलिक, धैर्यशील मान, आमदार अमल महाडिक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com