दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा निर्णय आधीच झालाय. मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सारी धरण जोडली जाणार. या दोन्ही प्रयत्नातून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प युती शासनाने केला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर औरंगाबाद येथील श्रीहरी पॅव्हेलियन मध्ये रविवारी (ता. १७) भाजप शिवसेना युतीचा मराठवाडा विभागीय मेळावा पार पडला. या वेळी ते बोलत होते. मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सेना नेते संजय राऊत, भाजप प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. प्रीतम मुंडे, आमदार सुजितसिह ठाकूर आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजप शिवसेनेची सत्तेसाठी युती नाही, हिंदुत्वाच्या मुद्यावर युती. मराठवाड्यातील आठही जागा युतीच्याच येतील. शेतकऱ्यांच्या खात्यात आजवर २१ हजार कोटींची कर्जमाफी केली. पंतप्रधान किसान सन्मान योजना थेट शेतकऱ्यांच्या खाती जमा होताहेत. कार्यकर्त्यांनी चारा पाणी जनावरांना मिळते की नाही, पाण्याचे टँकर, योजना पोचतात की नाही यावर लक्ष ठेवा. राज्यात ५० हजार कोटींचे रस्ते सुरू आहेत. कोल्हापुरात २४ तारखेला महायुतीची सभा होईल तिथं आमचे सारे सहकारी एकत्र येतील. आमदार खोतकर म्हणाले, मुख्यमंत्री आणि आणि उद्धवजीनी युती धर्म आम्हा दोघांना (रावसाहेब दानवेना) समजावून सांगितला. आम्ही कडवे शिवसैनिक. आजपासून युतीच्या कामाला लागणार. दिलेल्या जबाबदारीला न्याय देणार. पंकजा मुंडे म्हणाल्या, युतीचा काडीमोड होण्यासाठी देव पाण्यात ठेवणाऱ्यांना युतीची ताकद दाखवून देण्याची वेळ आहे. देशाला भ्रष्टाचारमुक्त, विकासाचं सरकार देण्यासाठी एकदिलाने काम करा, विजय निश्चत. खासदार दानवे म्हणाले,  येत्या निवडणुकीत यूपीए विरुद्ध एनडीएचा सामना. सरकारची कामगिरी जनतेत जाऊन सांगा. लोकांना युतीच शासन काम करू शकतो हे पटलंय. वैयक्तिक संघर्ष नाही. अर्जुनाने धनुष्य खाली ठेवलं आनंद आहे. सर्वात जास्त सक्षम युती जालन्यात हा अनुभव आहे. जबाबदारी वाढली ः ठाकरे औरंगाबादची समांतर जलवाहिनी, कचरा प्रश्न सोडविण्यास शासनाने मदत करावी. मराठवाड्यातील कॅनालच्या चाऱ्या पोटचाऱ्याचे काम झाले पाहिजे. आपल्याला केवळ मते नको जनतेचे आशीर्वाद हवे. योजना जाहीर केल्या, पण त्या सामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम व्हावे. युती जाहीर होताच विरोधकांचा आवाज बंद झाला. टीका करणारे विरोधी पक्षात राहतीलच याची खात्री नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com