आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले व्यक्त करणार ‘दिल की बात’

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले व्यक्त करणार ‘दिल की बात’
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले व्यक्त करणार ‘दिल की बात’

पुणे : शेतकरी आत्महत्या प्रश्नांचे भयावह वास्तव केंद्र सरकारला समजावे, यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले ‘दिल की बात’ व्यक्त करणार आहेत. यासाठी सेवाग्राम संस्थेने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती सेवाग्रामचे विनायक पाटील यांनी (ता. २८) पत्रकार परिषदेमध्ये दिली. या कार्यक्रमाचे निमंत्रण सर्व शेतकरी संघटनांसह ज्येष्ठ नेते शरद पवार, काॅग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, चंद्राबाबु नायडु आदी नेत्यांना देण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनादेखील निमंत्रण दिले असून ते आले नाही तर १ जून राेजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी धडक देणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाब येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या २१ कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करणार अाहे, यासाठी मी माझी शेती विकली आहे. हा कार्यक्रम १ जून राेजी दिल्लीच्या काॅन्स्टिट्यूशन क्लबच्या मालवणकर हाॅलमध्ये हाेणार आहे. या कार्यक्रमात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले आत्महत्या करताना वडिलांची मानसिक स्थिती काय हाेती हे सांगणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com