तेलंगणमध्ये मिरची उत्पादन घटणार

तेलंगणमध्ये मिरची उत्पादन घटणार
तेलंगणमध्ये मिरची उत्पादन घटणार

हैदराबाद, तेलंगण : गेल्या वर्षी मिरचीच्या जास्त उत्पादनामुळे चर्चेत असलेल्या तेलंगणमध्ये यंदा २० टक्के उत्पादन कमी राहण्याचा अंदाज येथील फलोत्पादन विभागाने व्यक्त केला आहे. मागील हंगामात उत्पादनवाढीमुळे कमी दर मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा शेतकरी इतर पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत, हे यामागील कारण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्याच्या फलोत्पादन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांतून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार २०१७-१८ मध्ये मिरची उत्पादनासाठी लागवडीखालील क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत २०% कमी आहे. २०१७ मध्ये मिरचीचे जास्त उत्पादन झाल्याचा राज्यातील उत्पादकांना फटका बसला होता. परिणामी अनेकांनी इतर पिकांकडे आपला मोर्चा वळविला आहे. २०१६-१७ मध्ये मिरची लागवड १२.४३ लाख हेक्टरवर होवून ४८.२९ लाख टन उत्पादन झाले होते.

कापसालाही फटका? आक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने आणि गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने तेलंगणमध्ये अनेक भागांतील कापसाचे नुकसान झाले. डिसेंबरच्या मध्यावधीपर्यंत ६.५ लाख टन कापसाची बाजार समित्यांमध्ये आवक झाली होती. राज्यातील एकूण लागवड क्षेत्राच्या ४९ टक्के क्षेत्रावर झालेली कापसाची ही लागवड लक्षात घेता आवकेचे हे प्रमाण कमीच आहे. ही सर्व परिस्थिती पाहता कापसाच्या उत्पादनातही १५ ते २० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीमुळे अनेक शेतकरी इतर पीक लागवडीकडे वळले आहेत. सरकारने आतापासून येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यास तयार असले पाहिजे. -किरण विसा , सदस्य, रयतू स्वराज वेदिका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com