दुष्काळ केवळ मोठ्या धरणांमुळे संपणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळ केवळ मोठ्या धरणांमुळे संपणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दुष्काळ केवळ मोठ्या धरणांमुळे संपणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली : राज्यातील दुष्काळ केवळ मोठ्या धरणांच्या माध्यमातून संपणार नाही. त्यासाठी गावागावातील जलसंधारणची कामे महत्त्वाची ठरणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.     जत तालुक्‍यातील बागलवाडी आणि आवंढी लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी (१८) केली.   मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘आवंढी गावातील दुष्काळ हटवण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट अभिनंदनास पात्र आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आज संपूर्ण गाव जात, पात, गट-तट विसरून एकत्र आले आहे. गाव जर मैदानात उतरलं तर दुष्काळ पराजित होऊ शकतो, हे गावातील जनतेने दाखवून दिले आहे. तसेच मी आज या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात श्रमदान केले आहे, ते काही कामाचे नाही; पण तुमच्या बरोबर श्रमदान केल्याचा मला अभिमान आहे,’’ असे मुख्यमंत्री म्हणाले.  या वेळी आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांसमवेत श्रमदान केले. ग्रामस्थ आणि महिलांशी संवादही साधला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com