मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी: चव्हाण

मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी: चव्हाण
मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी: चव्हाण

मुंबई : शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या लाँग मार्चला काँग्रेसला पाठिंबा असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. संपूर्ण कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी मंगळवारी, ६ मार्चला नाशिकवरून निघालेल्या महाराष्ट्र किसान सभेच्या शेतकरी लाँग मार्चला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. लाँगमार्चमध्ये मजल दरमजल करीत मुंबईत पोचलेल्या हजारो शेतकरी उद्या (सोमवारी) विधान भवनाला घेराव घालणार आहेत. कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतीमालाला दीडपट भावाची हमी द्या आदी विविध मागण्यांसाठी हा लाँग मार्च निघाला आहे. 

याविषयी ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे, की शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या नाशिक-मुंबई किसान लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या सरकारविरोधातील या संघर्षात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com