बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

सीआयसीआरचे संचालक डॉ. व्ही. एन. वाघमारे बोलताना.
सीआयसीआरचे संचालक डॉ. व्ही. एन. वाघमारे बोलताना.

वर्धा :  गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने सुचविलेल्या उपाययोजना अमलात आणण्यासाठी संबंधित राज्यांचे कृषी विभाग, कापूस उत्पादक शेतकरी, बीज उत्पादक कंपन्या, जिनिंग मिल्सचे मालक, शेती संबंधित कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आदींनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे (सीआयसीआर) संचालक डॉ. व्ही. एन. वाघमारे यांनी केले.

गिरड येथील मगन संग्रहालयाच्या नैसर्गिक शेती विकास केंद्रात सीआयसीआरच्या वतीने आयोजित “गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन” या विषयावरील शेतकरी कार्यशाळेत ते बोलत होते.

आपल्या भाषणात डॉ. वाघमारे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर बोंड अळीने ओढविलेल्या परिस्थितीची पुढील हंगामात पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. शिवाय ‘सीआयसीआर’ने सुचविलेल्या उपाययोजना शासन स्तरापासून कापूस उत्पादकांपर्यंत अमलात आणल्यास पुढील वर्षी बोंड अळीला वेळीच आळा घालणे शक्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. हिंगणघाटचे उपविभागायीय कृषी अधिकारी श्री. मोरे यांनी समुद्रपूर तालुक्यातील बोंड अळीच्या प्रादुर्भावाबाबत संक्षिप्त विवरण केले.

सीआयसीआरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. वासनिक यांनी ई-कपास आणि ‘मेरा गाव मेरा गौरव’ या कार्यक्रमाविषयी शेतकऱ्यांना विस्तृत माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com