आंदोलनाच्या धगीतही साडेपाच लाख टनांचे गाळप पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : ऊसदराच्या प्रश्नावरुन सोलापूर जिल्ह्यात विविध शेतकरी संघटना आक्रमक  झाल्या असताना, जिल्ह्यातील २६ साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, त्यांनी गुरुवारपर्यंत (ता.९) एकूण ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे.

यंदा हंगामाच्या अगोदरपासूनच शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. पण ऊसदराचा तिढा अद्याप सुटता सुटत नाही. गेल्याच आठवड्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील दराचा प्रश्न सुटला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा विषय मार्गी लावला. पण सोलापूरचे असणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मात्र शेतकरी संघटना थेट त्यांच्या घरावर आणि संपर्क कार्यालयावर धडक मारल्यानंतर आता बैठकीस राजी झाले आहेत.

आंदोलनाचे हे चित्र असे असताना जिल्ह्यातील जवळपास २६ कारखान्यांनी मात्र गाळप जोरात सुरू केले आहे. अवघ्या नऊ दिवसात ५ लाख ६२ हजार ३६७ मेट्रिक टनाचे गाळप झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com