ग्राहकांसाठी शेतकऱ्यांवर संक्रांत ः पृथ्वीराज चव्हाण

ग्राहकांसाठी शेतकऱ्यांवर संक्रांत ः पृथ्वीराज चव्हाण
ग्राहकांसाठी शेतकऱ्यांवर संक्रांत ः पृथ्वीराज चव्हाण

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : ‘‘देशातील साखर उद्योग अडचणीत येण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचित्र मानसिकता व तत्त्वज्ञान कारणीभूत आहे. केंद्राचे साखर धोरण या ग्राहकांकडे पाहून ठरवले जात असल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला मात्र शून्य किंमत मिळत आहे. ग्राहकांना खूष ठेवण्यासाठीच ऊस उत्पादकांवर संक्रांत आणण्याचे धोरण केंद्र सरकार राबवत आहे,’’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी (ता.१) केला. चव्हाण म्हणाले, ‘‘कोणत्याही प्रश्‍नावर शेतकरी संघटित होत नाही हे मोदींना समजले आहे. यामुळे ते नेहमी भांडवलदार व ग्राहकांना नजरेसमोर ठेवून शेतीमालाविषयी धोरण ठरवित आहेत. साखर उद्योगाबाबतही हाच अनुभव येत आहे. दोन-चार टक्के घटकांसाठी ९० टक्‍क्‍यावरील ग्राहकांना नाराज करायचे नाही ही त्यांची मानसिकता तयार झाली आहे. प्रत्येक शेतमालाबाबत त्यांची अशीच भूमिका आहे.’’ तोटा भरून काढण्यासाठी महागाई पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘नोटाबंदी व जीएसटीच्या कार्यवाहीमुळे झालेला तोटा भरून काढण्यासाठी विविध करांचा भार वाढवून इंधन दरवाढीला खतपाणी घातले जात आहे. इंधनाच्या मूळ दरात घसरण होऊनही देशात त्याचे भाव वाढत आहेत. या माध्यमातून सरकारला वर्षात दहा लाख कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तिजोरी भरण्यासाठी सर्वसामान्यांना वेठीला धरण्याचे काम भाजप सरकार करत आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com