नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने जिल्हा परिषद व भूजल सर्वेक्षण विभागाने तपासले असून, त्यांतील १२४ गावांतील पाणी दूषित आढळून आले. हे प्रमाण ४.६९ टक्के एवढे कमी असले, तरी पावसाळ्यात ते वाढते. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. भूगर्भातील पाणीसाठा जमिनीपासून अकरा मीटरपेक्षाही खोल गेला आहे. अनेक विहिरी व जलाशय आटू लागले आहेत. यंदा मॉन्सूनही पाच दिवस उशिरा दाखल होण्याचा अंदाज आहे. तसेच सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पावणेआठशे टॅंकर सुरू आहेत. कूपनलिका, विहिरी, तलावांमध्ये अतिशय कमी पाणी शिल्लक आहे. हा पाणीसाठा पिण्यास योग्य असावा,

यासाठी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. सध्या १२४ गावांतील पाणी दूषित असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे. या अहवालानुसार नगर तालुक्‍यात सर्वाधिक दूषित पाणीसाठे आढळून आले, तर श्रीरामपूर तालुका हा सर्वाधिक शुद्ध जल असलेला तालुका ठरला. श्रीरामपूर तालुक्‍यात एकाही गावात दूषित पाणी आढळून आलेले नाही. 

सर्वाधिक दूषित पाणी नगर तालुक्‍यात जिल्ह्यातील सर्वाधिक दूषित पाणीसाठे नगर तालुक्‍यात आढळून आले आहेत. तालुक्‍यातील निमगाव घाणा, देऊळगाव, गुणवडी, गुंडेगाव, खडकी, खंडाळा, बाबुर्डी बेंद, हिवरे, घोसपुरी, सारोळा कासार, कोल्हेवाडी, हातवळण, मठपिंप्री, बाळेवाडी या गावांतील पाणीसाठे दूषित आढळले आहेत.   दूषित पाणीसाठ्यांची आकडेवारी : पारनेर २७, अकोले ७, नगर ३४, संगमनेर ६, शेवगाव ८,पाथर्डी     १२,राहुरी ६, जामखेड १,श्रीगोंदे ८, कोपरगाव ३, कर्जत ८, नेवासे ३, राहाता १. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com