शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाकपचा आज मोर्चा

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाकपचा आज मोर्चा
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाकपचा आज मोर्चा

नाशिक/नगर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, यासह विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी नाशिक येथील विभागीय कार्यालयावर आज (ता. १६) शेतकरी, कामगार व असंघटित कामगारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी दिली. या मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे राज्यसचिव कॉ. तुकाराम भस्मे, राज्यसहसचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉ. स्मिता पानसरे, कॉ. राजू देसले, जिल्हा सचिव कॉ. शांताराम वाळुंज, कॉ. भास्कर शिंदे, कॉ. हिरालाल परदेशी, कॉ. माणिकदादा सूर्यंवशी आदी करणार आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी शेतकऱ्यांना लागू करा, शेतकरी व शेतमजुरांना वयाच्या वर्षांनंतर हजार रुपये निवृत्ती वेतन मिळावे, कृषी पंपाचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी विरोधी धोरण मागे घ्यावे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान हजार रुपये दरमहा वेतन मिळावे, जिल्हा परिषद शाळा बंद निर्णय मागे घ्यावा, सेवा निवृत्त इ.पी.एस.अंतर्गत पेन्शनधारक साखर, वीज, विडी कामगार, कंत्राटी कामगार, सफाई कामगार, औद्योगिक कामगार, सहकारी संस्था कर्मचारी, विडी कामगारांना निवृत्ती वेतन मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे असे लांडे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com