दोषी नसलेल्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊ : पणन राज्यमंत्री

पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत
पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत

नागपूर : तूर विक्री घोटाळ्यात दोषी नसलेल्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी (ता. २०) विधानसभेत दिले. भाजपचे आमदार मिलिंद माने यांच्या या संदर्भात तारांकित प्रश्न मांडला होता.

या वेळी श्री. माने म्हणाले, गेल्या वर्षी राज्यात तुरीचे बंपर उत्पादन आले. त्यामुळे राज्य सरकारने तूर खरेदीसाठी खरेदी केंद्रे सुरू केली. या ठिकाणी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्री करून कोट्यवधी रुपये कमावले. जालना जिल्ह्यातील बनावट नावाने तूर विक्री केल्याप्रकरणी ४९ शेतकरी आणि ९ व्यापाऱ्यांवर स्थानिक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणात शेतकऱ्यांना नाहक गोवण्यात आले आहे. तेव्हा त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार आहे का, असा सवाल त्यांनी सरकारला केला.

आमदार वीरेंद्र जगताप यांनीसुद्धा ही मागणी केली. त्यावर सदाभाऊ खोत म्हणाले, की या प्रकरणी ७० व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. यात तूर विक्रीतून ९२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाले. त्यापैकी ८४ लाख रुपये आरटीजीएस तसेच धनादेशद्वारे व्यापाऱ्यांच्या खात्यांत जमा झाल्याचे आढळून आले आहे. याची चौकशी सुरू आहे.

यात शेतकऱ्यांचा दोष नसल्यास त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील. तसेच याही वर्षी तूर खरेदी सुरू आहे, त्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणी करण्यात आली असल्याचेही श्री. खोत यांनी स्पष्ट केले. तसेच शेतमाल खरेदीबाबत अार्द्रता १२ टक्के असावी, असे नियम आहेत. यात सवलत देण्याची मागणी केंद्र सरकारला केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com