पाण्याअभावी फळबागांवर संकट

पारंपरिक पिकांपेक्षा केळी, संत्रा उत्पादनाकडे वळालो. सुमारे अडीच लाख रुपये खर्च केला. मात्र आता दुष्काळी परिस्थितीमुळे मेहनत आणि पैसा दोन्ही वाया गेले. - संजय रामनाथ ताडे, शेतकरी, बोर्डी.
पाण्याअभावी फळबागांवर संकट
पाण्याअभावी फळबागांवर संकट

अकोला : फळबागांसाठी अोळख असलेल्या अकोट तालुक्यात यावर्षी शेतकरी पाणी पातळी घटल्याने अडचणीत अाले अाहेत. पाण्याअभावी फळबागा सुकू लागल्या अाहेत. सोबतच जनावरांच्याही चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला अाहे. काही दिवसांपूर्वी हिरव्यागार दिसणाऱ्या बागा पाण्याअभावी सुकताना पाहून शेतकरी हवालदिल बनले आहेत. काहीजण उपलब्ध असलेल्या अपुऱ्या पाण्यावर फळबागा जगविण्याची धडपड करीत असल्याचे चित्र आहे. 

अकोट तालुक्यात केळी, संत्र्याच्या बागांना दुष्काळाचा मोठा फटका बसत आहे. हातात उत्पन्न येण्याआधीच पाण्याअभावी या बागा करपून जात असल्याचे चित्र प्रामुख्याने बोर्डी परिसरात पहायला मिळते आहे.

बोर्डी गावातील शेतकरी संजय रामनाथ ताडे व विशाल भालतिलक यांनी केळी व संत्र्यांची बाग जोपासली होती. एकूण तीन एकरावर बाग उभी केली. ती फुलवली. मात्र, यंदा अल्प पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. विहिरीला पाणी होते, तोपर्यंत देऊन या बागा जगविल्या. मात्र पाऊसच नसल्याने भूजल पातळीही खालावली आहे. त्यामुळे विहिरीचेही पाणी आटत चालल्याने पाहून त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही फार काळ टिकला नाही. विहिरी कोरड्या पडल्याने हा प्रयोग फसला.

तीन एकरावरील केळीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. मात्र पीक हाती पडण्यापूर्वीच बागा करपल्या. त्यामुळे आता जितका खर्च या बागा जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी केला, तोही निघणे अशक्य दिसत अाहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com