पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटका

पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटका
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटका

चितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गुरुवारी (ता. २१) रात्री दहा वाजेच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे चितेगाव (ता. पैठण) परिसरातील पैठणखेडा, बाभुगाव, केसापुरी, जयतपूर, इमामपूर वाकी, पानरांजणगाव व गाडेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. 

दुष्कळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्याला अवकाळीने फटका दिला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात पाणी उपलब्ध होते त्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व ज्वारीची पेरणी करून पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले. पीक चांगली बहरलेली ज्वारी काढणीच्या अवस्थेत तर गहू व हरभरा परिपक्वतेच्या अवस्थेत असताना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानक विजाचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. अंदाजे अर्धा तास सुरू असलेल्या पावसामुळे शेतात उभी असलेली पिके आडवी झाली. आंब्याचा मोहोर गळून पडला आणि होत्याचे नव्हते झाले.

खाम नदीतून पाइपलाइन टाकून शेतात पाणी घेतलेल्या इमामपूर वाकी, पैठणखेडा, केसापुरी, गाडेगाव (गंगापूर), पानराजणगांव व गंगापूर तालुक्‍यांतील पिपरखेडा आदी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर म्हारोळा व फारोळा परिसरात आसलेल्या वीटभट्ट्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. अशा शेतकरी व विटभट्टी व्यवसाय करणाऱ्या लोकांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व वीटभट्टी व्यावसायिकांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com