पावसाच्या खंडामुळे पिके संकटात

पावसाच्या खंडामुळे पिके संकटात
पावसाच्या खंडामुळे पिके संकटात

परभणीः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे वाढीच्या, परिपक्वेतेच्या अवस्थेतील पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. बहरात आलेली पिके पावसाने दडी मारल्यामुळे संकटात आहेत. उघडिपीमुळे किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिके वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप पिकांची वेळेवर पेरणी झाली. काही मंडळामध्ये पेरणीस उशीर झाला. जुलैच्या पहिल्या पंधरावाड्यामध्ये रिमझिम पाऊस पडत होता. भिजपाऊस पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरला. परंतु रविवार (ता. २२) पासून या जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कडक ऊन पडत आहे.

त्यामुळे हलक्या, बरड जमिनीवरील तसेच कमी पाऊस झालेल्या भागातील पिके सुकू लागली आहेत. विहिरी बोअरच्या पाणीपातळीत वाढ न झाल्यामुळे संरक्षित पाणी देता येत नाही. सध्या मुगाचे पीक फुलोरा तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. उडीद, सोयाबीनवाढीच्या तसेच फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. कपाशीच्या पिकाला पाते, फुले लागत आहेत. तूर, ज्वारी, बाजरी, हळदीचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. शेंगा परिपक्वतेच्या अवस्थेतील मुगाच्या पिकाला पावसाची अत्यंत गरज आहे. लवकर पाऊस आला नाही, तर उत्पादनात घट येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com