नगरमध्ये शेतकऱ्यांसमोर पिके जगवण्याचे संकट

शेतकऱ्यांसमोर पिके जगवण्याचे संकट
शेतकऱ्यांसमोर पिके जगवण्याचे संकट

नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या तीस दिवसांपासून पाऊस गायब आहे. त्यामुळे खरिपाची पिके वाचवण्याचे गंभीर संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले असून, पाऊस येण्याची शक्‍यता दिसत नसल्याने त्यात वरचेवर भर पडत आहे. भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अजून आठ दिवस पाऊस आला नाही, तर बहुतांश पिके वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दोन महिने उलटले, तरी पाऊस नसल्याने यंदा जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत चार लाख १७ हजार ४७२ हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची ८७.२२ टक्के पेरणी झालेली आहे. पीक जगविण्याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. संगमनेर तालुक्‍याच्या पठार भागातील बाजरी, तूर, उडीद, सोयाबीन, मूग, मटकी पिके अडचणीत आली आहेत. पारनेर तालुक्‍यात पश्‍चिम भागात वाटाणा, तसेच काही भागांत सोयाबीन, बाजरी, मूग, उडदाचे पीक घेतले जाते. पाथर्डी, जामखेड, शेवगाव, नेवासा, कर्जत भागातील बाजरी, कापसाचे पीक अडचणीत आले आहे. चारापिकांचे क्षेत्रही घटले आहे. जिल्ह्यामधील राहाता, राहुरी, कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा भागांत उसाचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. गतवर्षी चांगला पाणीसाठा असल्याने ऊस लागवडीचे क्षेत्र वाढलेले आहे. यंदाही बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यात ऊस लागवड झाली आहे. पावसाळ्यात त्यास पाणी देण्याची गरज भासत नाही; मात्र पाऊसच नसल्याने उसाचे पीकही पाण्याअभावी अडचणीत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com