मराठवाड्यातील प्रकल्पांत ३३.६० टक्के उपयुक्त पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : पावसाळ्याचा कालावधी संपत आलेला असताना मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी घट होताना दिसत आहे. मोठे, मध्यम, लघू प्रकल्पांसह नद्यांवरील बंधारे मिळून ८६४ प्रकल्पांत केवळ ३३.६० टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम व लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा चिंतेत भर घालणारा आहे. शिवाय मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थिती फारशी समाधानकरक नसल्याचे चित्र आहे.

मराठवाडा पावसाच्या प्रदीर्घ खंडांचा सामना करतो आहे. पाऊस नसल्याने मराठवाड्यातील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत नाही. १४ सप्टेंबरअखेरच्या आकडेवारीनुसार संकल्पित पाणीसाठ्याच्या तुलनेत मराठवाड्यातील एकूण ८६४ प्रकल्पांत केवळ ३३.९०  टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. ७ सप्टेंबरअखेरच्या अहवालानुसार हा पाणीसाठा ३४.२३ टक्‍के इतका होता. संकल्पित पाणीसाठ्याच्या तुलनेत गत आठवड्यात ३८.९७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असलेल्या ११ मोठ्या प्रकल्पांपैकी माजलगाव व सिनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. शिवाय मांजरा व येलदरी प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक नाही.

७५ मध्यम प्रकल्पांपैकी जवळपास २८ प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामध्ये औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी ९, जालन्यातील ३, उस्मानाबादमधील ६ तर लातूर जिल्ह्यातील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. ७४५ लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थितीही चिंतेत भर घालणारी आहे. गत आठवड्यात २२.३७ टक्‍के  उपयुक्‍त असलेला लघू प्रकल्पांतील पाणीसाठा १४ सप्टेंबरअखेर २२.१८ टक्‍क्‍यांवर आला आहे.

गोदावरी नदीवरील ९ बंधाऱ्यांत ६० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असून तेरणा, मांजरा, रेणा नद्यांवरील २४ बंधाऱ्यांमध्येही केवळ २७.३८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. गत आठवड्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात जवळपास एक टक्‍क्‍याची घट नोंदली गेली आहे. शिवाय लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही एक टक्‍क्‍याची घट नोंदली गेल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमधील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढले आहे. ७ सप्टेंबरअखेर मराठवाड्यातील ११ प्रकल्पातील १.८५४० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याची नोंद होती. मात्र १४ सप्टेंबरअखेर २.२६०० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com