पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये ९६ टक्के पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर झालेल्या पावसाने बहुतांशी धरणे आेसंडून वाहिली. उजनीसह जिल्ह्यातील सर्व २५ धरणांंची एकूण क्षमता २१६.८४ टीएमसी असून, शनिवारी (ता. ८) यात २०८.८२ टीएमसी (९६ टक्के) पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने जवळपास सर्वच धरणांतून नदीपात्रात होणारा विसर्ग थांबविण्यात आला आहे. पिण्यासाठी व शेतीसाठी काही धरणांच्या कालव्यातून पाणी साेडण्यात येत आहे.

मुठा खोऱ्यातील खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत धरणांमध्ये मिळून सुमारे २७.८२ टीएमसी (९५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. वरसगाव आणि टेमघर धरण १०० टक्के भरले आहे. तर मुळा नदीच्या खोऱ्यातील पवना, मुळशी, भीमेच्या उपखोऱ्यातील चासकमान, कळमोडी, भामा असखेड या धरणांमध्येही १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. निरा नदीच्या खोऱ्यातील निरा देवघर, भाटघर, गुंजवणी आणि वीर ही धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. सुरवातीला चिंताजनक स्थितीमध्ये असलेल्या कुकडी खोऱ्यातील धरणांमध्येही सध्या ३०.८५ टीएमसी (८३.४९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. उजनी धरण काठोकाठ भरले पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी वरदान असलेले उजनी धरण काठोकाठ भरले आहे. पुण्यातील नद्या ओसंडून वाहिल्याने ऑगस्ट महिन्यातच धरण १०० टक्के भरल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. उजनी धरणामध्ये शनिवारी (ता. ८) ११७.२१ टीएमसी एकूण पाणीसाठा असून, यातील ५३.५७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असल्याचे पुणे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com