पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणांनी गाठला तळ

पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणांनी गाठला तळ
पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणांनी गाठला तळ

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांनी तळ गाठला असून, सहा धरणे कोरडी पडली आहेत. सध्या जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.  पुणे जिल्ह्यात लहान-मोठी एकूण २४ धरणे आहेत. या धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी, तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना होतो. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अतिउष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी होती. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांत अवघा अठरा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा वेळेवर पाऊस न झाल्यास या धरणातील पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तर, नाझरे, पिंपळगाव जोगे, घोड, विसापूर, टेमघर, वरसगाव ही धरणे कोरडी पडली असून, सहा धरणांत अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. उर्वरित धरणात अल्प पाणीसाठा आहे.  सध्या डिंभे धरणातून डाव्या कालव्याला सहाशे, घोड धरणातून वीस, तर वीर धरणातून ८२७ क्युसेसने विसर्ग सोडलेला आहे. वीर धरणातून उजव्या कालव्याला ११५१, खडकवासला धरणातून १४०१ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान असून, काही भागांत पाऊस होत आहे. परंतु, धरणातील पाणीपातळी वाढविण्यासाठी जोरदार पावसाची गरज असून,  येत्या दहा ते पंधरा दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास ही धरणे पुन्हा भरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com