हतनूर धरणात ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांपैकी असलेल्या हतनूर धरणात फक्‍त ५ टक्के उपयुक्त साठा शिल्लक राहिला आहे. यामुळे या धरणावर पिण्याच्या पाण्यासह इतर वापरासाठी अवलंबून असलेल्या गावांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. 

या धरणात गाळ अधिक जमा झाला आहे. त्यामुळे अलीकडच्या तीन ते चार वर्षांत मार्चमध्येच पाणीसाठा १८ ते २० टक्‍क्‍यांवर येतो. या धरणातून सुमारे २० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच भुसावळ शहर, दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्र, जळगाव येथील औद्योगिक वसाहतीतही या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. साठा कमी होत असल्याने उन्हाळी पिकांना पाणी देता येणार नाही, हे निश्‍चित आहे.

पुढील आठ ते १० दिवसांत साठा आणखी कमी होईल. धरणाचे बॅकवॉटरही कमी झाले आहे. धरणातून गाळ काढण्याची मागणी आता पुढे येत असून, त्यासाठी शासन व मोठ्या संस्थांनी पुढाकार घेण्याची मागणी केली जात आहे. अजून पावसाला सुरवात झालेली नाही. धरण लवकर भरते, परंतु त्यातून पाण्याचा वापरही अधिक केला जातो.

चोपडा, यावल, रावेर या तालुक्‍यांतील शेतीला या धरणाच्या पाण्याचा लाभ होतो. यंदा रब्बीचे आवर्तन सोडले होते. त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठीच अधिक वापर झाला आहे. यातच जळगाव व भुसावळ तालुक्‍यातील तापी नदीकाठच्या गावांमधील पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून हतनूरचे पाणी नदीत सोडण्याची मागणी ग्रामस्थ व सरपंचांनी प्रशासनाकडे केली आहे. धरणात पाणी कमी असल्याने ही मागणी मान्य झालेली नाही, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com