नाशिक जिल्ह्यातील धरणांत २० टक्के उपयुक्त पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : जिल्ह्यातील सर्व १०३ प्रकल्पांत २०१७ च्या तुलनेत यंदाच्या मे महिन्याच्या अखेरीस पाच टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मेअखेरीस जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा १५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे शहरात पाणीकपात करण्याची वेळ आली होती. यंदा मात्र जिल्ह्यात २० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, तर विभागातील ३५३ प्रकल्पांत २०.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्यातील मध्यम, लघू आणि मोठ्या प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दलघफू इतकी आहे. त्यापैकी सध्या १३ हजार ४८९ दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी १० हजार १२० दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक होता. परिणामी, पाणीकपात करण्याची वेळ आली होती. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीकपातीचे सावट दूर झाले आहे.

जिल्ह्यातील सात मोठ्या प्रकल्पांपैकी गंगापूर, करंजवण, दारणा, मुकणे आणि कडवा या पाच प्रकल्पांत गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. चणकापूर आणि गिरणा या दोन मोठ्या प्रकल्पांत मात्र गेल्या वर्षीच्या पाणीसाठ्यापेक्षा यंदा कमी पाणीसाठा आहे. आळंदी, पुणेगाव, भावली, वालदेवी आणि नागासाक्‍या हे पाच प्रकल्प गेल्या वर्षी कोरडे पडले होते.

यंदा मात्र या प्रकल्पांत काही प्रमाणात पाणी आहे, तर भोजापूर आणि माणिकपुंज हे दोन्ही प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षीही कोरडेठाक पडलेले आहेत. मॉन्सूनचे आगमन वेळेवर झाल्यास पाणीटंचाईचे संकट ओढवणार नाही. मात्र, मॉन्सूनचे आगमन लांबल्यास पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com