कृषिपंपांना दिवसा आठ, रात्री १० तास वीज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : सध्या राज्यात मागणी एवढी वीज उपलब्ध असल्यामुळे कृषिपंपांच्या ग्राहकांना शनिवारच्या (ता. ९) मध्यरात्रीपासून रात्री १० तास व दिवसा आठ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

सप्टेंबर २०१७ मध्ये विविध कारणांमुळे देशात कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली होती. परिणामी पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध नसल्याने कृषिपंपांच्या वीजपुरवठ्याच्या वेळात बदल करून तो रात्री आठ तास, तर दिवसा आठ तास अशा पद्धतीने करण्यात येत होता.

शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्यात सुसूत्रता आणण्यासाठी व वीजप्रणालीच्या सुरक्षिततेसाठी महावितरणने विभागनिहाय वेळापत्रक तयार केले असून, त्याची अंमलबजावणी ५ ऑक्‍टोबरपासून करण्यात आलेली आहे.

त्यानुसार कृषिभाराचे योग्य नियोजन करून कृषिपंपांच्या वेळापत्रकात आवश्‍यकतेनुसार बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, डिसेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी रात्री दहा, तर दिवसा आठ तास वीज मिळणार असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com