वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घट

वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घट
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घट

नाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील मौसम नदीपात्रातील वाळूउपसा अवैधरित्या झाला. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली. परिणामी, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर नदीवरील पुलास मोठा धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने वाळूउपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

मागील वर्षी साधारण पाऊस झाल्यामुळे यंदा मार्च महिन्यापासून विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाळूउपशामुळे कमालीची घट झाली. महसूल विभागाची परवानगी नसताना नदीपात्रात गाढव, ट्रॅक्टर, बैलगाडी या माध्यमातून अवैधरित्या वाळूउपसा रात्रंदिवस सुरू आहे. वाळू माफिया यांना ग्रामपंचायत विभागाने व तलाठी कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या. तरीही वाळूचोरी थांबलेली नाही. बैलगाडी व गाढवांद्वारे  वाळू वाहून ती इतर ठिकाणी साठवली जाते. त्या ठिकाणाहून रात्री ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून आजूबाजूच्या परिसरात विक्री होत आहे. 

सध्या लोकसभा निवडणुकीचे कामकाज चालू असल्याने महसूल विभाग त्या कामास व्यस्त आहे. त्यामुळे वाळू चोरी वाढली आहे. विंचूर -प्रकाशा राज मार्गावरील या नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात आले. तो धोक्यात आहे. पुलाच्या आजूबाजूस पाचशे मीटरपर्यंत वाळूउपसा करू नये, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयास पत्र दिले. ताहाराबाद गावासह पिंगळवाडे, करंजाड पाणी योजना विहिरी असल्याने वाळूउपशामुळे तळ गाठला आहे. हा वाळूउपसा बंद करावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com