नवी दिल्ली ः शेतमालास योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अार्थिक अडचणीत अाहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठविले अाहे.
दरम्यान, देशातील १८४ शेतकरी संघटनांचा सहभाग असलेले अांदोलन दिल्लीत मंगळवारी (ता. २१) दुसऱ्या दिवशीही सुरू होते. सोमवारी (ता. २०) शेतकरी संघटनांनी किसान मुक्ती संसद घेऊन शेतमालास योग्य हमीभाव अाणि संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीचे ठराव मंजूर केले. दुसऱ्या दिवशीही अांदोलनात शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदनही पंतप्रधानांना देण्यात अाले अाहे. सर्व शेतमालास किफायतशीर दर मिळावा, शेतमाल खरेदीची कार्यक्षम यंत्रणा अाणि बाजार हस्तक्षेपासाठी ठोस धोरण अाखावे. शेतकऱ्यांना सर्व कर्जापासून मुक्ती द्यावी अादी मागण्या निवेदनातून केल्या अाहेत.