यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः माणिकराव ठाकरे

यवतमाळ जिल्ह्यात काॅंग्रेसची पदयात्रा
यवतमाळ जिल्ह्यात काॅंग्रेसची पदयात्रा

वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना काही तालुकेच दुष्काळग्रस्त जाहीर करून भेदभाव केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त होईस्तोवर काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिला.

काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष ॲड. राजू कासावार यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर व सामान्यांच्या प्रश्‍नांसाठी वणी तालुक्यातील टाकळी ते टाकळी अशी पदयात्रा काढण्यात आली आहे. या पदयात्रेला माणिकराव ठाकरे यांनी हिरवी झेंडा दाखवला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा होते. माजी मंत्री वसंत पुरके, सुभाष धोटे, वामनराव कासावार, जिल्हा परिषद सभापती अरुणा खंडाळकर  या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com