कांदा दरवाढीसाठी किमान निर्यातमूल्य पूर्णपणे हटवण्याची मागणी

कष्टाने पिकविलेल्या शेतीमालावरच सरकार बंधन का घालते? निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीचे नुकसान होते. तेव्हा सरकार शेतकऱ्यांचा किती विचार करते? आता निसर्ग आणि बाजाराच्या नियमामुळे जर कांदा उत्पादकांना खर्च निघेल असा भाव मिळत असेल, तर सरकारने त्याच्या आड येऊ नये. किमान निर्यात मूल्याचे बंधन पूर्णपणे काढावे. - गणपत मवाळ , चोंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक.
कांदा दर
कांदा दर
नाशिक  : कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांदादरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत आहे. गेल्या महिन्यात चार हजारांची पातळी गाठणाऱ्या कांद्याला सद्यःस्थितीत कमाल दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे. कांदा दरात आणखी घसरण झाली, तर शेतकरी संकटात सापडण्याची शक्‍यता आहे. यामुळे दरवाढीसाठी किमान निर्यातमूल्य पूर्णपणे हटविण्याची मागणी होऊ लागली आहे.
 
महाराष्ट्रासह इतर राज्यांत कांद्याची वाढलेली आवक आणि निर्यातमूल्य डॉलरमध्ये असलेली वाढ यामुळे सोमवारच्या तुलनेत कांदा दरात ३०० रुपयांची, तर मागील आठवड्याच्या तुलनेत १२०० रुपयांची घसरण झाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
 
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दररोज दोन लाख ते अडीच लाख क्विंटलची आवक होत आहे. पुणे, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतून कांद्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे नाशिकमधून मागणी कमी झाल्याने ही घसरण होत आहे. गेल्या महिन्यात सरकारने दीडशे डॉलरने निर्यातामूल्य कमी करून ७०० डॉलरवर आणले असले, तरी त्याचा निर्यातीला फारसा लाभ झालेला नाही. यामुळे निर्यातमूल्यात आणखी घट करण्याची मागणी होऊ लागली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com