संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

गुजरातप्रमाणे कपाशीला बोनस देण्याची मागणी

जळगाव : या हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे कपाशीला मोठा फटका बसला. उत्पादनात ३० टक्के घट निश्‍चित येईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे गुजरात सरकारने जसा कपाशीला बोनस दिला तसा महाराष्ट्र सरकारनेही जाहीर करावा. कपाशी उत्पादकांना त्यांच्या कष्टाचे मोल मिळेल, याची व्यवस्था सरकारने करायला हवी, अशी मागणी अशी मागणी चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. ३१) निवेदनाद्वारे तालुका प्रशासनाकडे केली.

निवेदनात म्हटले आहे, की कपाशीची दुबार, तिबार लागवड करावी लागली. जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने मोठा फटका बसला. पूर्वहंगामी कपाशीसारखेच कोरडवाहू कपाशीचे नुकसान झाले.

अनेक ठिकाणी पीक पुरते हातचे गेले. अशा स्थितीत ज्या शेतकऱ्यांचे कपाशीचे पीक वाचले होते, त्यांचे पीकही परतीच्या पावसात खराब झाले. कपाशीचा दर्जा घसरल्याचे सांगून दर पाडले गेले. कैऱ्या सडल्या. पावसाचा ताण आणि नंतरचा पाऊस यात नुकसान झाल्याने कापूस उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

उत्पादनात ३० टक्के घट निश्‍चित येईल, अशी स्थिती आहे. गुजरात सरकारने जसा कपाशीला बोनस दिला तसा महाराष्ट्र सरकारनेही जाहीर करावा. कपाशी उत्पादकांना त्यांच्या कष्टाचे मोल मिळेल, याची व्यवस्था सरकारने करायला हवी, अशी मागणी सुकाणू समितीचे विवेक रणदिवे, संजय पाटील, गणेश पवार, पंडित महादू मिस्तरी, तुकाराम भीमराव पाटील, सुभाष तुकाराम धनगर, संजय लाला पाटील, विक्रम शिवराम पाटील, जगन्नाथ सुपडू शिंपी, पितांबर मुकुंदा धनगर, शिवदास अर्जुन पाटील, राजू अभिमन पाटील, मुरलीधर दत्तू पाटील आदींनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com