मराठा आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या ः धनंजय मुंडे

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

मुंबई  : मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची राज्य सरकारची कारवाई सुडाची असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. सरकारने ही कारवाई थांबवावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

श्री. मुंडे यांनी म्हटले आहे, की मराठा आंदोलन चिघळण्यास सरकारचा बेजबाबदारपणा, असंवेदनशील वृत्ती आणि मंत्र्यांची वक्तव्ये कारणीभूत असताना, त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी मराठा आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसक कृत्ये, खुनाचा प्रयत्न असे गंभीर आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात येत आहे.

जिल्ह्याजिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सर्वच लोकप्रतिनिधींचे एकमत आहे. पोलिसांकडून आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अन्य आंदोलकांविरुद्ध सुरू करण्यात आलेली कारवाईदेखील थांबवावी. यासंदर्भात सर्व जिल्हा पोलिसप्रमुखांना निर्देश जारी करावेत, अशी मागणी श्री. मुंडे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com