येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण

येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण

नाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई तीव्र होत आहे. तालुक्यातील विहिरी, कूपनलिका, बोअरवेल हे जलस्त्रोत आटत चालल्याने ग्रामीण भागातही पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना तासनतास उभे राहून हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेकदा महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्रभर जागरण करून संघर्ष करावा लागत आहे. 

तालुक्यात पाणीपुरवठ्यासाठी 38 गाव नळपाणीपुरवठा योजना सुरळीत चालू आहे. अनेक गावे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या गावातील बंधारे, नदी नाले ओढे वाहिले तरच या गावातील पाणीपुरवठा योजना ठराविक दिवसांपर्यंत चालतात. मात्र, पावसाने दांडी मारल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चालू वर्षी उन्हाळ्यात या गावांना टँकरने पाणीपुरवठा किंवा पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनातून तलाव, बंधारे भरून घ्यावे लागत आहे. पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनातून बंधारे भरून दिल्यास या पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.

पाण्याची पातळी खालावत चालल्याने थोड्या फार प्रमाणात येणाऱ्या पाण्यावर गावाची तहान भागवावी लागत आहे. पालखेड डावा कालव्याच्या येणाऱ्या आवर्तनातून आरक्षित बंधारा भरणार असल्याने पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. - भाऊराव जाधव,  ग्रामपंचायत सदस्य - जऊळके

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिण्याचे पाणी, जनावरे दैनंदिन गरजांना पाणी लागत आहे, मागील सिंचनाच्या आवर्तनातून बंधारा भरला असता तर पाणीपुरवठा सुरळीत झाला असता. - विनायक जाधव, ग्रामस्थ जऊळके

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com