पाण्याचे सर्वांना समान वाटप व्हावे : आमदार देशमुख

पाण्याचे सर्वांना समान वाटप व्हावे : आमदार देशमुख
पाण्याचे सर्वांना समान वाटप व्हावे : आमदार देशमुख

सांगोला, जि. सोलापूर : नीरा-भाटघर धरणाचे पाणी पळवले, विकले आहे, असे चुकीचे आरोप होत आहेत. पाणीवाटपाचा निर्णय लोकप्रतिनिधी घेत नसतो, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जातो. पाणीवाटपाबाबत शासनाचा काय निर्णय होईल ते बघू. पण पाणी प्रश्नावर विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत. पाण्याचे सर्वांना समान वाटप व्हायला हवे, असे आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगितले.

सध्या नीरेच्या पाण्यावरून चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आव्हान दिले आहे. सांगोल्यासह दुष्काळी भागाचे पाणी बारामतीला पळवले, असा आरोप केला जात आहे. 

या पार्श्वभूमीवर देशमुख म्हणाले, पूर्वी नीरा-देवघर धरणाचे पाणी फलटण, खंडाळा व माळशिरस तालुक्‍यांतील काही भागांना देण्याचे नियोजन होते. कालवे तयार होत नाहीत, तोपर्यंत भाटघर-वीर धरणांचे ५७ टक्के पाणी फलटण, सांगोला, माळशिरस व पंढरपूर, तर ४३ टक्के पाणी इंदापूर, बारामतीला देण्याचे नियोजन होते. ६०-४० असे प्रमाण ठरले होते. याच प्रमाणात पाणीवाटप व्हायला हवे होते; परंतु चुकीच्या पद्धतीने पाणीवाटप करण्यात आले.‘‘

‘‘सांगोल्याच्या हक्काचे पाणी पळविल्याचा आरोप ही निव्वळ राजकीय स्टंटबाजी आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने पाणी प्रश्नाबाबत आरोप केले जात आहेत. चुकीचे आरोप करून काहीही साध्य होत नाही. पाणी प्रश्नावर प्रत्येकजण वेगवेगळे राजकीय निष्कर्ष काढत आहे. शासनाचा काय निर्णय होईल ते बघू, पण समान वाटप हेच धोरण असायला हवे,‘‘ असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com