देगावात दुष्काळाचा फळबागांना मोठा फटका

देगावात दुष्काळाचा फळबागांना मोठा फटका
देगावात दुष्काळाचा फळबागांना मोठा फटका

वाळूज, जि. सोलापूर : यंदाच्या भीषण दुष्काळाचा शेतीला सर्वाधिक फटका बसला आहे. पाण्याअभावी मोहोळ तालुक्‍यातील देगाव (वा) येथे एकाच शेतकऱ्याची केशर आंब्याची तीन हजारांपेक्षा अधिक झाडे फळासकट जळून गेली आहेत. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. 

देगाव (ता. मोहोळ) येथील शेतकरी विजयकुमार पोतदार व रत्नमाला पोतदार यांच्या शेतातील ही परिस्थिती आहे. दुष्काळात फळबाग जगविण्यासाठी केलेले सर्व उपाय निष्फळ झाले आहेत. दोन विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. पूर्वीचे तीन बोअर आटले आहेत. दोन महिन्यांपूर्वी नवीन घेतलेल्या बोअरच्या अर्धा इंच येणाऱ्या पाण्यावर ठिबकद्वारे झाडे जगविण्याचा प्रयत्न चालू आहे. १५ ते २० दिवसांपूर्वी पुन्हा ५०० फूट बोअर पूर्ण कोरडा गेला. त्यासाठी एकूण एक लाख १५ हजार रुपये पाण्यात गेले. जिवापाड जपलेली झाडे जळून जात असलेली पाहून काळीज तीळतीळ तुटत आहे, असे पोतदार यांनी सांगितले.

यावर्षीचा दुष्काळ हा १९७२पेक्षा भीषण असून वाळूज, देगावसह ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू असताना शेतातील पिके आणि फळबागा कशा जगवायच्या हा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.  - विजयकुमार पाटील, ज्येष्ठ शेतकरी, देगाव (वा.) मोहोळ

अलीकडच्या काळात भूगर्भातील पाण्याचा उद्योग, शेती आणि पिण्यासाठी होणाऱ्या भरमसाट उपशामुळे जमिनीची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. प्रत्येकाने बोअरचे जलपुनर्भरण करणे अत्यंत गरजेचे आहे.  - हेमलता सोनवणे-व्हटकर, सदस्या, पाणी फाउंडेशन टीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com