सोसायट्यांच्या बळकटीकरणातूनच गावांचा विकास

सोसायट्यांच्या बळकटीकरणातूनच गावांचा विकास
सोसायट्यांच्या बळकटीकरणातूनच गावांचा विकास

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे कर्ज शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम करणाऱ्या विकास सोसायट्यांच्या बळकटीकरणातून गावांचे अर्थकारण बदलेल आणि त्यातून गावांचा सर्वांगिण विकास होईल, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

अटल महापणन अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या विकास सोसायट्यांना सहकारमंत्री देशमुख यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी पणन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, जिल्हा मार्केटिंग अधिकारी दिलीप पाटील, शहर उपनिबंधक कुंदन भोळे आदी उपस्थित होते. 

सहकारमंत्री देशमुख म्हणाले, विविध कार्यकारी विकास सोसायट्यांनी गावातील स्थानिकांच्या गरजा ओळखून स्वत:चा व्यवसाय सुरू करावा. त्यातून अनेकांना रोजगारही मिळेल आणि गावातील लोकांच्या गरजा गावातच भागतील. त्या माध्यमातून विकास सोसायट्यांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल. त्यामुळे भविष्यात सोसायट्या सक्षम होऊन त्या स्वत:च कर्जवाटप करू शकतील. त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.

 या प्रसंगी प्रत्येक जिल्ह्यातील तीन विकास सोसायट्या, प्रत्येक विभागातील तीन खरेदी-विक्री संघ, प्रत्येक जिल्ह्यातील एक सहायक निबंधक, राज्यातील जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, एन. बी. करे, प्रकाश अष्टेकर व एक विभागीय सहायक निबंधक मिलिंद भालेराव यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात २०१८-१९ चे नियोजनही ठरले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com