नोटाबंदीमुळे कृषी, असंघटित क्षेत्राची वाताहत : धनंजय मुंडे

नोटाबंदीमुळे कृषी, असंघटित क्षेत्राची वाताहत : धनंजय मुंडे
नोटाबंदीमुळे कृषी, असंघटित क्षेत्राची वाताहत : धनंजय मुंडे

मुंबई - देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक निर्णयांपैकी नोटाबंदीचा हा सर्वांत अयशस्वी निर्णय आहे. त्याचे चटके वर्षभरानंतरही भारतीयांना सोसावे लागत आहेत. या निर्णयामुळे कृषी, असंघटित क्षेत्राची वाताहत, असा आरोपही विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. 

नोटाबंदीच्या निर्णयाला उद्या (ता. 8) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त मुंडे यांनी सांगितले की, नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना जी उद्दिष्टे देशाच्या पंतप्रधानांनी सांगितली, त्यापैकी एकही उद्दिष्ट सफल झाले नाही. या निर्णयाचा एकही चांगला परिणाम दिसून आला नाही. उलट असंख्य दुष्परिणाम मात्र भारतीयांना भोगावे लागत आहेत. वर्षभरात नोटाबंदीमुळे बेरोजगारीचे संकट आले. असंघटित व कृषी क्षेत्राची अपरिमित हानी झाली. विकास दरातील घट आणि उद्योगांना याचा प्रचंड मोठा फटका बसला. त्याचे चटके यापुढील काळातही किती दिवस सोसावे लागतील हे सांगता येत नाही. सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून सत्ताधारी पक्षाला अल्पकालीन राजकीय फायदा झाला असला तरी 125 कोटी जनतेला मात्र याचे चटकेच बसल्याचे ते म्हणाले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे कृषी क्षेत्रावर आणि राज्य अर्थकारणावर झालेल्या चांगल्या-वाईट परिणामांची श्‍वेतपत्रिका काढण्याची हिंमत सरकारने दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com