धर्मराजाचा कडाही यंदा आटला

धर्मराजाचा कडाही यंदा आटला
धर्मराजाचा कडाही यंदा आटला

माजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला धर्मराजाचा कडा यंदा आटल्याने परिसरातील विहीर, विंधन विहिरीची पाणीपातळी कमालीची घटली असल्याने या भागातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. १९७२ नंतर पहिल्यांदाच या कड्यातील पाणी आटल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे. 

यावर्षी कमी पावसामुळे खरीप, रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातचा गेला. धरणालगतच धर्मराजाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागे धर्मराजाचा कडा आहे. या कड्यात बाराही महिने मुबलक पाणीसाठा असतो. यामुळे या कड्यालगत असणारी देवखेडा, नांदूर, पुनंदगाव, नागझरी या गावांत असणाऱ्या विहिरी, विंधन विहिरींची पाणीपातळी कमी होत नव्हती; परंतु हा कडा आटल्याने परिसरातील पाणीस्रोत बंद झाला आहे. 

या भागातील नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे, तर १९७२ ला निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत देखिल या कड्याला मुबलक पाणी होते. अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु, पिण्यासाठी या कड्यात पाणी उपलब्ध होते. निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे हा कडा देखिल आटला असल्याने परिसरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.

परिसरातील ग्रामस्थांची धर्मराज मंदिरातील धर्मनाथावर मोठी भक्ती आहे. या कड्यातील पाणी या श्रद्धेमुळे कधीच आटत नव्हते; परंतु या वर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे कड्यातील पाणी, तर आटलेच आहे; परंतु परिसरातील पाणी स्रोतही आटला आहे.  - बाळूराम मायकर, देवखेडा.

धर्मराजाच्या कड्यात असलेल्या पाण्यामुळे या भागातील जनावरांना पिण्यासाठी पाणी व चाऱ्याकरिता पाणी उपलब्ध होत असे; परंतु या कड्यातील पाणीसाठा आटल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.  -रामेश्वर साखरे, माजलगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com